in , ,

Shivaji Maharaj information in Marathi – शिवाजी महाराज यांची मराठी मध्ये माहिती

सुरतेची पहिली लूट

राजगडापासून ३२५ किमी उत्तरेस असलेल्या दक्षिण गुजरातमधील सुरत शहर त्यावेळी मोगलांचे आर्थिक केंद्र आणि प्रमुख व्यापारी बंदर होते. युरोप, आफ्रिका तसेच मध्यपूर्वेशी येथून मोठ्या प्रमाणात व्यापार होई.

या व्यापारावरील करातून मोगलांना दरवर्षी लाखो रुपयांचे उत्पन्न मिळे.

सुरतेतील आर्थिक व भोवतीच्या सैनिकी हालचालींवर नजर ठेवण्यासाठी शिवाजी महाराजांनी आपला मुख्य हेर बहिर्जी नाईक याची नेमणूक केली.

सुरतेची बित्तंबातमी काढून बहिर्जीने शिवाजी महाराजांची भेट घेतली व सुरतेवर हल्ला केला असता मोठा खजिना हातात येईल असे सांगितले.

यावर मसलत करून महाराजांनी सुरतेवर चाल करून जाण्याचा बेत रचला.

कागदोपत्री ५,००० सैनिक असलेल्या सुरतेत प्रत्यक्ष १,०००च्या आसपास लढते सैनिक होते.

बहिर्जी नाईक व त्याच्या हेरसंस्थेने याचाही माग लावलेला होता व शिबंदी परत वाढण्याआधीच हल्ला केल्यास सफल होईल असाही सल्ला शिवाजी महाराजांस दिला होता.

शहराबाहेरून तसेच आतूनदेखील होणार्‍या हल्ल्यांविरुद्ध बंदोबस्त करतानाच मराठ्यांनी शहराची लूट सुरू केली. मोगल ठाणेदार व महसूलदप्तरांचे खजिने पुरते रिकामे केले गेले.

दरम्यान पोर्तुगीजांकडे स्वतःचा बचाव किंवा हल्ला करण्यासाठी पुरेसी शिबंदी नाही हे लक्षात येताच त्यांनी पोर्तुगीजांकडूनही खजिना मिळवला.

त्याचबरोबर तीन दिवस सतत मराठा सैनिकांनी शहरातील सावकारांच्या वाड्यांतून अमाप संपत्ती गोळा केली.

“सावकारांचे वाडे काबीज करून सोने, चांदी, मोती, पोवळे, माणिक, हिरे, पाचू, गोमेदराज अशी नवरत्‍ने; नाणी, मोहरा, पुतळ्या, इभ्राम्या, सतराम्या, असफ्या, होन, नाणे नाना जातींचे, इतका जिनसांच्या धोंकटीया भरल्या.

कापड भांडे तांब्याचे वरकड अन्य जिन्नस यास हात लाविलाच नाही. असे शहर चार दिवस अहोरात्र लुटिले.”

शक्य तितक्या कमी वेळात शक्य तितकी संपत्ती गोळा करून मोगलांच्या इतर ठाण्यांवरून कुमक येण्याआधी सुरतेतून पसार होणे मराठ्यांना अत्यावश्यक होते.

अखेर गोळा केलेला मुबलक खजिना घेउन १० जानेवारी रोजी मराठ्यांनी सुरतेतून काढता पाय घेतला.

मागावर असलेल्या मोगल तुकड्यांना झुकांड्या देत मराठे पुन्हा तापी खोर्‍यातून खानदेशात व तेथून राजगडाकडे आले.

Shivaji Maharaj information in Marathi

राज्याभिषेक

६ जून इ.स. १६७४ रोजी शिवाजीराजांना रायगडावर राज्याभिषेक करण्यात आला. त्या दिवसापासून शिवाजीराजांनी शिवराज्याभिषेक शक सुरू केला आणि शिवराई हे चलन जारी केले.

या शिवाय नवी कालगणना सुरू होऊन नवा शक सुरू झाला, फारसी-संस्कृत शब्दकोश बनवला गेला. यामध्ये फारसीच्या जागी संस्कृत शब्द वापरणे यासाठी हुकुम जारी केले.

तसेच पंचांगशुद्धी करण्याची सक्ती केली. यासाठी कृष्ण दैवज्ञ नामक ज्योतिषी आणवला.

या ज्योतिष्याने ग्रंथ लेखन करावे आणि संबंधितांना रित घालून द्यावी असा आदेश दिला.

तसेच त्याज कसडून ‘करणकौस्तुभ’ नामक ग्रंथही लिहवून घेतला.

भारताचे शूरवीर शिवाजी महाराज जगापासून कायमचे निघून गेले.

सर्वात धैर्यवान आणि शूर योद्धा शिवाजी महाराजांचा प्रभाव फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण जगावर झाला,

म्हणूनच त्यांनी वयाच्या अवघ्या 50 व्या वर्षी मराठा साम्राज्याबाहेर आपले राज्य स्थापन केले.

ते एक शूर राजा होते, त्यांच्या कडे 300 किल्ले आणि सुमारे 1 लाख सैनिकांची एक मोठी सेना होती आणि त्यांनी त्यांच्या सैन्याची मोठी काळजी घेतली होती.

असे म्हणतात की, आपल्या जीवनाच्या शेवटच्या काळात, त्यांना आपल्या राज्याबद्दल फारच काळजी वाटू लागली,

ज्यामुळे त्यांची तब्येत ढासळली आणि सलग ३ आठवडे त्यांना तीव्र ताप होता, त्यानंतर ३ एप्रिल १६८० रोजी त्यांचे निधन झाले.

अशाप्रकारे एक महान आणि धैर्यवीर योद्धा शिवाजी महाराज जगापासून कायमचे निघून गेले, परंतु त्यांच्याद्वारे केलेली कामे लोक नेहमीच लक्षात ठेवतील. ते एक महान हिंदू संरक्षक देखील होते.

महाराजांनी हिंदू समाजाला एक नवीन दिशा दाखवली. शिवाजी महाराजांनी हिंदूंच्या उद्धारासाठी बरीच कामे केली

आणि यामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांवर विश्वास ठेवणारे लोक देवासारखी त्यांची पूजा करतात.


More info : Wiki


तुम्हाला दिलेली शिवाजी महाराज(Shivaji Maharaj information in Marathi) यांची माहिती आवडली असेल.

हि माहिती तुमच्या मित्र – मैत्रीणीना फेसबुक, ट्विटर आणि इतर सोशल मीडियासारख्या सोशल नेटवर्क्सवर हे पोस्ट शेअर करा. MarathiBiography.com धन्यवाद

अजिंक्य रहाणे यांची माहिती - Ajinkya Rahane Information in Marathi

अजिंक्य रहाणे यांची माहिती – Ajinkya Rahane Information in Marathi